Background
⚡ मुरुम ते संभाजीनगर ⚡

बसवराज मंगरूळे

शेतकऱ्याचा मुलगा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, शिक्षण संस्थापक, समाजसेवक

"कर्तृत्ववान संघर्षयोद्धा"

मुख्यपृष्ठ परिचय

त्वरित तथ्य

पूर्ण नाव बसवराज विश्वनाथ मंगरूळे
जन्मदिनांक ७ सप्टेंबर १९६४
जन्मस्थान मुरुम, ता. उमरगा, धाराशिव
वडिलांचे नाव विश्वनाथ मंगरूळे
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
शिक्षण बी.ई. (इलेक्ट्रिकल)
मुरुम ते संभाजीनगर

कर्तृत्ववान संघर्षयोद्धा

बसवराज मंगरूळे... आपल्या धाराशिव जिल्ह्याला हे नाव नवखं वाटत असेल, पण धाराशिवच्याच मातीत या नावाचा जन्म झाला, येथील मातीतच पहिली पाऊलं पडली, याच मातीत शिक्षणाची आणि समाजिक जाणीवांची बीजे रोवली. उमरगा तालुक्यातील मुरुम गावच्या शेतकरी कुटुंबात ७ सप्टेंबर १९६४ रोजी त्यांचा जन्म झाला.

शालेय शिक्षण गावात आणि महाविद्यालयीन शिक्षण धाराशिवला पूर्ण केल्यानंतर शासकीय इंजिनिअरींगला नंबर लागल्याने त्यांनी संभाजीनगर गाठलं. गावच्या मातीनेच नेतृत्त्वगुण अंगी भरले होते. म्हणूनच, सन १९८२-८३ साली महाविद्यालयीन निवडणुकीत विजयी होत ते इंजिनिअरींग कॉलेजचे युआर बनले. तर, १९८५-८६ साली विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष झाले.

आपल्या अध्यक्षपदाचा उपयोग विद्यार्थ्यांसह संस्थेलाही झाला पाहिजे, याच हेतुने त्यांनी १९८५-८६ साली महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह कॅबिनेट मंत्र्यांनाही निमंत्रित केलं. याच कार्यक्रमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कॉम्प्युटर सायन्स व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेश ब्रांच संभाजीनगरमध्ये सुरू करण्याची मागणी केली आणि मंजुरी मिळवली.

"मी बसवराजच्या मागे नाही, सोबत आहे. सावली कधीच साथ सोडत नाही."

गोपीनाथ मुंडे, माजी केंद्रीय मंत्री

जीवनप्रवास

संघर्ष ते यश

मुरुमच्या शेतकरी कुटुंबापासून भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

७ सप्टेंबर १९६४

जन्म

उमरगा तालुक्यातील मुरुम या गावी शेतकरी कुटुंबात जन्म. वडील विश्वनाथ मंगरूळे.

१९८२-८३

विद्यार्थी संघटक

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, संभाजीनगर येथे प्रवेश. महाविद्यालयीन निवडणुकीत विजयी होत युआर (University Representative) बनले.

१९८५-८६

विद्यार्थी संसद अध्यक्ष

विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष झाले. महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमास मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांना आमंत्रित करून नवीन शाखांसाठी मंजुरी मिळवली.

१९९०-२०००

राजकीय कारकिर्दीस सुरुवात

गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्य.

२००४-०९

जिल्हाध्यक्ष, भाजपा औरंगाबाद

भाजपा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष. महापालिकेत प्रथमच १८ जागांवर उमेदवार निवडून आणले.

२००७

श्रीयश प्रतिष्ठानची स्थापना

संभाजीनगर येथे श्रीयश शिक्षण संकुलाची स्थापना. अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए महाविद्यालय सुरू.

२०११ पासून

रोजगार मेळावे

दरवर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन. पहिल्याच वर्षी ४०० तरुणांना नोकरी मिळवून दिली.

२०१८ पासून

मोफत आरोग्य शिबिरे

फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन. हजारो रुग्णांचे निदान व उपचार.

२०२०

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती.

नोव्हेंबर २०२२

सिनेट सदस्य

संस्थाचालक गटातून सर्वाधिक मतांनी सिनेट सदस्य म्हणून विजयी.

फेब्रुवारी २०२३

व्यवस्थापन परिषद सदस्य

संस्थाचालक गटातून व्यवस्थापन परिषदेवर विक्रमी मतांनी निवड.

Social Work

समाजसेवा

कोविड काळात ३५००+ कुटुंबांना मदत

३६+
वर्षे सेवा
समाजसेवा

जनसेवा हाच धर्म

कोविड-१९ सेवा

लॉकडाऊनच्या काळात आशा वर्कर व कामगार वर्गातील ३५०० हून अधिक कुटुंबांना काही महिने पुरेल एवढे अन्नधान्याचे किट वाटप.

आरोग्य शिबिरे

दरवर्षी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिरे. हजारो गरजू रुग्णांचे मोफत निदान व उपचार.

रोजगार मेळावे

२०११ पासून दरवर्षी रोजगार मेळाव्याचे आयोजन. पहिल्याच वर्षी ४०० तरुणांना रोजगाराच्या संधी.

जलसंधारण

पाणी अडवा-पाणी जिरवा अभियानांतर्गत ३५,००० वृक्षारोपण. शेततळ्यांना प्रोत्साहन.

वृक्षारोपण

फडणवीस साहेबांच्या प्रेरणेतून संभाजीनगर येथे पहिली वृक्षदिंडी काढली. आत्तापर्यंत ३५ हजार झाडांची लागवड व संवर्धन.

१०,०००+ स्वयंसेवक
शैक्षणिक क्षेत्र

श्रीयश शिक्षण संकुल

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वसा

अभियांत्रिकी महाविद्यालय

(Shreeyash College of Engineering)

औषधशास्त्र संस्थान

(Shreeyash Institute of Pharmaceutical Education & Research)

व्यवस्थापन संस्थान (MBA)

(Shreeyash Institute of Management)

अभियांत्रिकी महाविद्यालय (पॉलिटेक्निक)

(Shreeyash College of Engineering – Polytechnic)

औषधशास्त्र शिक्षण व संशोधन

(Shreeyash Institute of Pharmaceutical Education & Research)

औषध महाविद्यालय

(Shreeyash Institute of Pharmacy)

आयुर्वेदिक महाविद्यालय

(Shreeyash Ayurvedic College)

आयुर्वेदिक रुग्णालय

(Shreeyash Ayurvedic Hospital)

आमचे ध्येय

धाराशिव जिल्ह्याचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास साधताना प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणणे. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व महिला सक्षमीकरण.

आमचा संकल्प

ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सुविधा व पायाभूत सुविधा निर्माण करणे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे व त्यांना योग्य बाजारभाव मिळवून देणे. "धाराशिव नवपर्वारंभाचे" स्वप्न साकार करणे.

आपणही व्हा या अभियानाचा भाग

बसवराज मंगरूळे यांच्या कार्यात सहभागी व्हा आणि धाराशिवचा विकास करूया.

संपर्क साधा